अंधेरीपुढील प्रवास टाळा
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 11:05पश्चिम रेल्वेवरील विलेपार्ले ते चर्चगेट टप्प्यातील डीसी-एसी परिवर्तनाची महत्त्वाकांक्षी मोहीम रविवार, ५ फेब्रुवारीस पार पडणार आहे. यामुळे 'डीसी'वर (डायरेक्ट करंट) चालणा-या लोकल इतिहासजमा होणार असून यापुढे लोकल नव्या दमाच्या 'एसी'वर (अल्टर्नेटिव्ह करंट) धावणार आहेत.
काळा घोडा फेस्टिव्हल
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 11:05'द टाइम्स ऑफ इंडिया काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल, २०१२'ची धूम आज, शनिवार ४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. १९९९पासून सुरू झालेल्या या फेस्टिव्हलचे यंदाचे १४वे वर्ष आहे.
अजंता वॉचच्या मालकावर हल्ला
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 11:05अजंता वॉचचे मालक जयसुखभाई पटेल यांच्यावर शक्रवारी सायंकाळी वरळी येथे हल्ला झाला. जखमी अवस्थेत त्यांना जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सावध घ्या निर्णय आता!: पवार
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 11:05टू-जीबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाने निर्णय प्रक्रियेत शैथिल्य येणार हे स्पष्ट आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. सरकारचा प्रत्येक निर्णय घेताना सावध दृष्टीकोन ठेवावा लागेल, असे पवार यांनी स्पष्ट केले.
दिल्लीत घुमवणार आवाज
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 11:05राज्यातील सर्वच पक्षांनी वेगवेगळ्या कारणांनी माध्यमांची कार्यालये आणि पत्रकारांवर हल्ले केले आहेत. मात्र पत्रकार संरक्षण कायदा अद्याप झालेला नाही. त्यामुळे आता थेट पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याकडे दाद मागावी लागेल, असा सूर टाइम्स इमारतीवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी जमलेल्या पत्रकार संघटनांनी लावला.
सक्त कारवाई करा!
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 11:05कुठल्याही वृत्तपत्राच्या कचेरीवर हल्ला करण्याच्या कृत्याचा पुरस्कार करता येणार नाही. त्यामुळे 'महाराष्ट्र टाइम्स'वरील हल्ल्याचा आपण तीव्र शब्दांत निषेध करतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, केंदीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिली.
एटीएसच्या हाती भक्कम पुरावे
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 11:05दिल्लीतील चांदनी चौक येथून अटक केलेला हवाला ऑपरेटर कमलनयन पथरेजा याच्या गाझियाबादेतील घरावर एटीएसने टाकलेल्या छाप्यात दोन मोबाइल, एक सिम कार्ड आणि दोन डायऱ्या सापडल्या असून १३/७च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात ते भक्कम पुरावे ठरतील, अशी माहिती एटीएसप्रमुख राकेश मारिया यांनी दिली.
मुंबईत डिझेल इंजिनवर चालणा-या गाड्या
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 11:05गर्दीच्यावेळी दर तिस-या मिनिटाला मुंबईतल्या स्टेशनांतून नऊ किंवा बारा डब्यांची गाडी सुटते आणि हजारो प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसरीकडे नेते. दिवसभरात २५ लाखापेक्षा जास्त नागरिक रेल्वेतून प्रवास करतात. अशा या मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर रविवारी विजेवर चालणा-या इंजिनांऐवजी डिझेलची इंजिने दिसणार आहेत.
पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांची चौकशी करणार!
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 11:05पत्रकार/ त्यांच्या कार्यालयांवर हल्ले, सरकारी जाहिराती रोखणे, धमक्या देणे अशा वेगवेगळ्या प्रकारे अनेक राज्यांत प्रसारमाध्यमांची गळचेपी केली जात असल्याबद्दल प्रेन्स कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय कटजू यांनी शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात महाराष्ट्र, छत्तीसगढ आणि जम्मू-काश्मीर सरकारांना पत्र पाठवले असून अशा तक्रारी जास्त असलेल्या राज्यांत सत्यशोधन समिती पाठवण्याचा विचारही त्यांनी बोलून दाखवला.
पत्रकारांसाठी 'पोल खोल' स्पर्धा
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 11:05मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळीत सुरू असतानाच निवडणुकीत कोण किती जागा मिळवणार, याचे आडाखे बांधायला सुरुवात झाली आहे. याबाबतचा अचूक अंदाज वर्तवण्याची स्पर्धा मुंबईतील पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आली असून एकूण पाच लाखांची घसघशीत पारितोषिकेही ठेवण्यात आली आहेत.
...तर रस्त्यावर सभा घेऊ- राज ठाकरे
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 01:05शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मिळते पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मात्र परवानगी मिळत नाही. आम्हाला शिवाजी पार्क मिळाले नाही तर रस्त्यावर सभा घेऊ, अशा खास ठाकरी बाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट इशारा दिला आहे. हायकोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर राज यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
मनसेच्या इंजिनाला 'लाल सिग्नल'
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 01:05मुंबई मनपाच्या निवडणुकीत मनसेच्या इंजिनाची शिटी वाजवण्यासाठी राज ठाकरे यांना शिवाजी पार्कवर प्रचारसभेची परवानगी हवी होती. मात्र यासाठी हायकोर्टात दाखल करण्यात आलेली याचिका आज कोर्टाने फेटाळली. शिवाजी पार्कवरील प्रचारसभेसाठी धावणा-या मनसेच्या इंजिनाला कोर्टाने दिलेल्या लाल सिग्नलमुळे ब्रेक लागला आहे.
मुंबईत रोज टीबीचे सरासरी २५ बळी
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 01:05उघड्यावर थाटलेले संसार, आजूबाजूला असणारी अस्वच्छता आणि त्यामुळे होणा-या आजारांबद्दलची जाणिव नसल्याने मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आलयं. मुंबईत क्षयरोगाने रोज सरासरी २५ बळी जातात, अशी धक्कादायक आकडेवारी समोर आलीय. २०१०-११ साली या रोगाने ३१६८ रुग्ण दगावले. आधीच्या वर्षाच्या तुलनेने हा आकडा १० टक्क्याने अधिक होता.
रितेश-जेनेलिया 'शुभमंगल'
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 01:05ग्रॅण्ड हयातच्या ग्रॅण्ड वातावरणामध्ये शुक्रवारी थाट रंगला होता अस्सल मऱ्हाटमोळी वऱ्हाडी लग्नाचा. निमित्त होते ते देशमुखांचे द्वितिय पुत्र चि.रितेश आणि डिसुझा कन्या चि. सौ. कां. जेनेलिया यांच्या लग्नाचे. यासाठी ग्रॅण्ड हयात या सप्ततारांकीत हॉटेलचा कोपरा न कोपरा सजला होता!
पवारांकडून राष्ट्रवादीची कानउघडणी
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 01:05लोकशाहीत टीका करणे अयोग्य नाही. पण वैयक्तिक टीका चुकीची असून, ती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टाळावी. अन्य पक्षाचे नेते कसेही वागू देत, पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संयम सोडू नये. अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजितदादा-आरआर आबांचे कान उपटले.
