प्रचारांची लगबग जोमाने

प्रचाराला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने जिल्ह्यात सर्वत्र प्रचारांची रणधुमाळी शिगेला पोहाचली आहे. सकाळपासुनच उमेदवारांची प्रचारांसाठी लगबग सुरु होत आहे. शहरापासुन नजीक असलेल्या सातारा, देवळाई गटातही प्रचाराचा चांगलाच ज्वर चढला आहे. वाहन रॅली, पदयात्राने परिसर गजबजून जात असतानाच नागरी प्रश्न खरेच कोण तडीस लावणार असा प्रश्न मतदारांना पडल्याशिवाय मात्र राहत नाही.

सासू-सुन,जावा-जावांची लढत लक्षवेधी

बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी नातेवाईकांतच लढाई असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. कुठे सासू-सूना तर कोठे जावा-जावा एकमेकींसमोर दंड थोपटून उभ्या आहेत. रक्ताचे नाते असूनही ते विसरून निवडणुकीच्या आखाड्यात वेगवेगळ्या पक्षाकडून ही मंडळी आपले नशिब आजमावत आहेत. नात्यागोत्याच्या या महाभारतात विजय कोणाचा होतो हे मतदार राजाच ठरवणार आहे.

अनेक ठिकाणी काट्याची लढत

जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात काट्याची लढत पहायला मिळत असून थेट भाजपा-सेना आणि राष्ट्रवादी अशी लढत होत असल्याने जिल्हा परिषदेच्या अनेक मतदारसंघ यंदा लक्षवेधी ठरत आहेत.

कोकणाचे स्वयंघोषित सम्राट वैफल्यग्रस्त

सत्ता आमच्याकडे अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे सत्तेचा गर्व होण्याचा प्रश्नच येत नाही. कोकणातील स्वयंघोषित अनभिषिक्त सम्राटपद लयास जात असल्याने नारायण राणे हे वैफल्यग्रस्त झाले आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी 'मटा'ला दिलेल्या खास मुलाखतीत केली.

'मिनी इंडिया'त विकासाचा मुद्दा गायब

वाळूज औद्योगिक वसाहतीजवळ रांजणगाव शेणपुंजी येथे राज्यातील विविध भागासह देशातील उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, आंध्र प्रदेश आदी गावांतून रोजगारासाठी आलेले लोक राहत आहेत. यामुळे या गावाला 'मिनी इंडिया' असे संबोधले जाते. या मिनी इंडियात सध्या जिल्हा परिषदेच्या प्रचारातून विकासाचे मुद्दे हद्दपार झाल्याचे चित्र समोर येत आहे.

दिल्ली और बहोत दूर

औरंगाबाद दिल्लीसाठी जेट एअरवेजच्या दोन विमानसेवा सध्या सुरू आहेत. यातील रात्रीची औरंगाबाद दिल्ली विमानसेवा २७ मार्चपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उघड झाले आहे. खरेतर दोन्ही विमानाला चांगला प्रतिसाद मिळत असताना एक सेवा बंद झाल्यानंतर लोकांना आणखीनच त्रासाचा सामना करावा लागणार आहे.

जातीयवादी पक्षांना दूर सारा- चव्हाण

'गेल्या पाच वर्षात शिवसेना-भाजप युतीने जिल्हा परिषदेत भ्रष्ट कारभार केला. विकासकामाचे वावडे असलेल्या या जातीयवादी पक्षांना येत्या निवडणुकीत बाजूला सारा,' असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील काँग्रेस उमेदवारांसाठी सिल्लोड येथे झालेल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री बोलत होते.

शिवसैनिकांना ४८ तासांची मुदत

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत नाराज शिवसैनिकांच्या उपदवाने शिवसेना नेते चांगलेच हैराण झाले आहेत. या नाराजांची माहिती काढण्यासाठी त्यांनी गावागावात 'गुप्तहेर' तयार केले आहेत. या गुप्तहेरांकडून मिळणा-या खडानखडा माहितीचा उपयोग नाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी केला जात आहे.

रस्त्यांच्या कामाचा नारळ फुटला

रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचा नारळ शुक्रवारी पालिका आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते फुटला. शहरातील तीन रस्ते डिफर्ड पेमेंटवर, तर सात रस्ते पालिकेच्या फंडातून केले जाणार आहेत. पुढील दोन महिन्यांत या सर्व रस्त्यांची कामे पूर्ण होतील, असा विश्वास पालिका आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी व्यक्त केला.

शिवसेनेला मुंबई महापालिका महत्त्वाची

'गेले दशकभर औरंगाबाद जिल्ह्यात जिल्हा परिषदेवर युतीची सत्ता आहे. या कालावधीत ग्रामीण भागाची प्रचंड दुर्दशा झाली आहे. याला जबाबदार असलेल्या शिवसेनेला मुंबई महापालिकाच महत्त्वाची वाटते. कारण ती सोन्याची अंडे देणारी कोंबडी आहे.

खासदार मुंडेंच्या मदतीला आ. पाशा पटेल रूपी लातूरकर

भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे आणि लातुरच नाते तसे जुने आहे. मुंडेंनी ज्या मतदारसंघातून प्रतिनिधीत्व केले. तो रेणापुर मतदारसंघ ज्यात लातुर जिल्ह्यातील अनेक गावे होती. तसेच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि मुंडे यांचे मैत्रीचे नातेही बीडकरांना चांगल ठाऊक आहे.

पेट्रोलपंपावर थांबणे पडले महाग

मनमाडहून एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती आगारासाठी डिझेल घेऊन निघालेल्या टँकरचालक आणि क्लिनरला देवगावजवळील एका पेट्रोल पंपावर रात्री थांबणे महागात पडले. टँकरवरील झाकणाचे पट्याचे पत्रे वाकवून १५०० लिटर डिझेलची चोरी करण्यात आली आहे.

विधानसभेचा इच्छुकांसाठी निवडणूक ठरणार महत्वाची

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांकडे सर्वच राजकीय पक्ष २०१४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहत आहे. या निवडणुकीचे निकालावरच राजकीय पक्ष आपली भविष्याची वाटचाल ठरवणार असून, विधानसभेच्या उमेदवारांची नावेही याच निवडणुकीत समोर येणार आहेत.

निवडणूक रिंगणात नेत्यांच्या गृहिणी

जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यानंतर ५० टक्के महिला आरक्षणामुळे अनेक सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र या महिला आरक्षणाचा फायदा खऱ्या अर्थाने राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना होत नसल्याचेच दिसत आहे.

राष्ट्रवादीने दिली डझनभर नातलगांना उमेदवारी

जिल्हा परिषदेच्या ५९ जागेसाठी येत्या ७ फेब्रुवारीला मतदान होत आहे. यासाठी वेगवेगळ्या पक्षांनी आपआपले उमेदवार दिले आहेत आणि आता प्रचारातही रंगत येत आहे. जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीत अनेक पक्षांनी आपल्या नातलगांना उमेदवारी देऊन कार्यकर्त्यांना मात्र वाऱ्यावर सोडल्याचेच चित्र आहे.