Margao

मडगावात बांधकाम हटविताना पालिकेचे कामगार.

मडगावात बांधकामे पाडली

मडगावात बांधकामे पाडली
मडगाव नावेली रेल्वे उड्डाण पुलाखाली असलेली बेकायदा बांधकामे काल मडगाव नगरपालिकेने पोलीस संरक्षणात मोडून टाकली. एक हॉटेल व दोन झोपड्यांचा यात समावेश आहे.
कित्येक तक्रारी त्या बांधकामासंबंधी होत्या. त्या हॉटेलात बारही केलेले होते व त्यात जुगारासारखे प्रकार चालविण्यात येत होते, असा आरोप होता. न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेच्या अभियंत्यांनी बांधकाम मोडून टाकले. आणखी काही बांधकामांच्या तक्रारी आहेत. तिही मोडून टाकण्यात येतील असे पालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

कॉंग्रेस, तेलगू देसम पक्षाच्या आमदारांचे तेलंगणासाठी राजीनामे

कॉंग्रेस, तेलगू देसम पक्षाच्या आमदारांचे तेलंगणासाठी राजीनामे
वेगळ्या तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारवर दबाव वाढविण्याच्या हेतूने आंध्र प्रदेशमधील तेलंगणा भागातील आमदार व खासदारांनी राजीनामा देण्याचे सत्र सुरू केले आहे. सोमवारी राजीनामा दिलेल्या आमदारांत तेलगु देसम पक्षाच्या (टीडीपी) सर्व ३३, कॉंग्रेस पक्षाच्या ४० व प्रजा राज्यम पक्षाच्या (पीआरपी) दोन आमदारांचा समावेश आहे. चार बंडखोेर टीडीपी आमदारांनी रविवारीच राजीनामे सादर केले होते. यामुळे राजीनामा दिलेल्यांची संख्या ७९ झाली आहे.

सीआरझेड बांधकामे पाडण्याच्या नोटिसा मागे का घेतल्या?

सीआरझेड बांधकामे पाडण्याच्या नोटिसा मागे का घेतल्या?
हायकोर्टाकडून पंचायतींना विचारणा
किनारी नियमन विभागातील ४२२ बांधकामे पाडण्यासाठी बजावलेल्या नोटिसा मागे घेण्याचा निर्णय कायदेशीर आहे काय? यासंबंधीचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने किनारी भागातील पंचायतींना दिला आहे. तसेच नोटिसा मागे का घेतल्या याचे उत्तर देण्यासाठी पंचायतीना एका महिन्याचा अवधी दिला आहे.

सरकारचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीलाही फटका ः चव्हाण

सरकारचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीलाही फटका ः चव्हाण
समन्वय समिती बैठकीचा आग्रह
गेल्या चार वर्षांच्या काळात राज्यात अनेक सार्वजनिक विषय निर्माण झाले. त्यामुळे वातावरण गढूळ बनले. सरकारचा घटक पक्ष म्हणून त्याचा आपल्या पक्षावरही विपरीत परिणाम होत आहे, त्यामुळे आघाडीच्या घटक पक्षांत समन्वय असावा यासाठी स्थापन केल्या जाणार्‍या समन्वय समितीच्या बैठकीचा आग्रह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने कॉंग्रेसकडे धरला आहे, अशी माहिती राष्ट्रवादीच्या गोवा प्रभारी भारती चव्हाण यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. गेल्या चार वर्षांच्या काळात उभय पक्षांच्या समन्वय समितीच्या बैठकाच झालेल्या नाहीत.

काळ्या पैशाच्या तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाची कडक पावले

काळ्या पैशाच्या तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाची कडक पावले
विशेष तपास पथक नियुक्त
भारतीयांनी विदेशी बँकांत साठविलेल्या काळ्या पैशाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने काल विशेष तपास पथकाची स्थापना केली. या पथकाला विदेश दौरे करून तेथील सरकारी संस्थांकडून भारतीयांच्या तेथील काळ्या पैशाबाबत आवश्यक ती माहिती गोळा करण्यास सांगण्यात आले आहे.
काळा पैसा परत आणण्यासंदर्भात केंद्र सरकार काही पावले उचलीत नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी आपली नाराजी व्यक्त केली होती.

पणजीतील कचर्‍यावर आता छोट्या मशिन्सद्वारे प्रक्रिया

पणजीतील कचर्‍यावर आता छोट्या मशिन्सद्वारे प्रक्रिया
बायंगिणी येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभा राहण्यास वर्षे लागणार असल्याने कचर्‍यावर प्रक्रिया करणारी छोटेखानी मशिन्स आणून पणजी शहरातील कचरा समस्या दूर करण्यावर भर देण्याचा निर्णय काल झालेल्या पणजी महापालिकेच्या बैठकीत घेण्यात आला.
याविषयी बोलताना महापौर यतीन पारेख म्हणाले, बायंगिणी येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यासाठी गोवा सरकारने जमीन दिलेली आहे खरी पण अजून त्या जमिनीचा वापर करण्यास परवानगी मिळालेली नाही.

वाघ यांच्याकडून आणखी तीन राजीनामे

वाघ यांच्याकडून आणखी तीन राजीनामे
मुख्यमंत्र्यांना लिहिले आणखी एक पत्र
उदयपूरच्या पश्‍चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राची केंद्रीय समिती, गोवा राजभाषा सल्लागार समिती आणि गोवा राज्य चित्रपट महोत्सव सल्लागार समिती अशा तीन समित्यांवरील सदस्यपदांचे राजीनाने काल विष्णू सूर्या वाघ यांनी संबंधित संस्थांकडे सुपूर्द केले. तिन्ही पक्षांच्या राजीनाम्यांसोबत श्री. वाघ यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना उद्देशून ‘मार्लीश’ (मराठी-इंग्रजी) भाषेत एक पत्र लिहिले असून त्यात सरकारच्या माध्यम विषयक धोरणाचा निषेध म्हणून आपण या समित्यांवरून बाजूला होत असल्याचे म्हटले आहे.
गेल्या आठवड्यातच श्री.

आंतरराज्य सेवा पुन्हा सुरू करण्याचे कदंबचे आश्‍वासन

आंतरराज्य सेवा पुन्हा सुरू करण्याचे कदंबचे आश्‍वासन
व्यवस्थापकीय संचालकांनी आंतरराज्य मार्गावरील बससेवा आज पासूनच सुरू करण्याचे आश्‍वासन कदंब कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
काल सकाळी कदंबच्या सुमारे २५० कर्मचार्‍यांनी पर्वरी येथे निदर्शने करून आंतरराज्य मार्गावरील बससेवा बंद न ठेवता ती त्वरित सुरू करण्याची मागणी केली होती. या मार्गामुळेच कदंबला नफा होत आहे. कदंबने वरील सेवा देणे बंद केल्यास खाजगी वाहतूक कंपन्या त्याचा फायदा उठवतील, असा इशारा आयटक नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी दिला.
कर्मचार्‍यांच्या अन्य प्रश्‍नावर दि.

भजनी पथक प्रमुखांची आज पणजीत बैठक

भजनी पथक प्रमुखांची आज पणजीत बैठक
भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या आवाहनानुसार भजनी कलाकारांनी यंदाच्या कला अकादमी आयोजित भजन स्पर्धेत निषेध प्रकटन करण्याचे ठरवले असल्याने गोवा कला अकादमीचे धाबे दणाणले असून आज बुधवार दि. ६ जुलै रोजी सर्व स्पर्धक भजनी पथकांच्या प्रमुखांची एक बैठक दुपारी तीन वाजता दीनानाथ मंगेशकर कलामंदिरात बोलावण्यात आली आहे. यंदाच्या भजन स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात काही मुद्द्यांवर चर्चा करून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या उद्देशाने ही बैठक
बोलावण्यात आली असल्याचे अकादमीच्या यासंदर्भातील पत्रकात म्हटले आहे.

Rathyatra

काल देशात ठिकठिकाणी जगन्नाथ रथयात्रा काढण्यात आल्या. अहमदाबादेतील रथयात्रेत सहभागी झालेले भाविक व जगन्नाथ, सुभद्रा व बलदेव यांचे रथ.

काळ्या पैशांसंदर्भात आज अंतरिम आदेश

काळ्या पैशांसंदर्भात आज अंतरिम आदेश
उन्हाळी सुटीनंतरच्या पहिल्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयापुढे आज काळ्या पैशाबाबतची याचिका सुनावणीस येणार असून त्यासंदर्भात अंतरिम आदेश जारी होण्याची शक्यता आहे. एलजीटी बँकेत काळा पैसा ठेवणार्‍या २६ भारतीयांची नावे जाहीर करण्यासंदर्भातील आदेश सर्वोच्च न्यायालय जारी करणार आहे. ही नावे जाहीर करण्यास केंद्र सरकारच्या वतीने विरोध दर्शवण्यात आला आहे. तसे केल्याने स्विस सरकारशी असलेल्या द्विपक्षीय संबंधांना बाधा पोहोचत असल्याचा सरकारचा दावा आहे.

वन रक्षणासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा

वन रक्षणासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा
डॉ. आमटेंचे आवाहन : अरण्यातील प्रकाशवाटा
आहेत त्या वनांचे रक्षण आम्ही केले तरच प्राणी जगतील. आम्ही त्यांचे नैसर्गिक अन्नच नष्ट करीत आहोत. वाघ, सिंह यासारखे हिंस्त्र प्राणीही प्रेमाने वागतात हा अनुभव आहे. वनांचे रक्षण करणे व ती वाढविणे ही लढाई तरुणांना लढायची आहे, असे मॅगासेस पुरस्कार विजेते थोर समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी सांगितले. हेमकशा येथील आदिवासी लोकांसाठी आपल्या पत्नी डॉ.

भाषेच्या बाबतीत लोकांनी स्वाभिमानी बनावे : तरुण विजय

भाषेच्या बाबतीत लोकांनी स्वाभिमानी बनावे : तरुण विजय
भाषेच्या बाबतीत लोकांनी स्वाभिमानी व्हायला हवे, असे भाजपचे राज्यसभा खासदार व पांचजन्यचे संपादक तरुण विजय यांनी काल सांगितले. ‘भारतीयकरण व भारतीय भाषा’ या विषयावर ते बोलत होते. इंग्रजी माध्यमाला अनुदान देऊन कॉंग्रेस सरकार लोकांचे अभारतीयकरण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

४३ लाखांच्या केबल्सची विक्री; अधिकार्‍यांना अटक

४३ लाखांच्या केबल्सची विक्री; अधिकार्‍यांना अटक
कुंडई येथील तेशकॉम कंपनीच्या आस्थापनाच्या मालकीची जवळ जवळ ४३ लाख रुपयांची केबल (तांब्याची तार ) परस्पर विकल्याच्या आरोपावरून संशयित आरोपी म्हणून कंपनीत काम करणार्‍याच दोन अधिकार्‍यांना त्यांच्या गावी जाऊन अटक करण्यात फोंडा पोलिसांना यश मिळाले.
सुनील सिंग (३६) पार्कसीटी सिल्वास दमण व निखिल कुमार रॉय (४५) भूईसर-ठाणे महाराष्ट्र अशी आरोपींची नावे असून सुनिल सिंग मार्किटिंग ऑफिसर म्हणून तर उप व्यवस्थापक म्हणून निखिल रॉय काम करत होता. दोघांनीही संगनत करून गुजरात येथे बोगस कंपनीच्या नावे ४३ लाखाची केबल पाठवली व त्यांच्याकडून चेक घेतला नाही.